Virat Kohli : भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. येथे गल्लीबोळात कुठेही क्रिकेट खेळे जाते. दरम्यान, क्रिकेटप्रेमीसाठी आयपीएल ही एख पर्वण असते. दरम्यान, 2008 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला सुरुवात झाली. तेव्हापासून या स्पर्धेला क्रिकेट चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत मुंबई, चेन्नई आणि केकआरने वर्चस्व गाजवलं दिसले. पण अनेक संघाना IPL विजतेपद पटकावता आले नव्हते. किंग कोहली ज्या आरसीबीच्या संघातून खेळतो, त्या संघाला IPL विजतेपद पटकावता आलं नव्हतं, मात्र यावर्षी आरसीबीने तसेच विराटने १८ वर्षानंतर आपले विराट स्वप्न पूर्ण केलं आहे.
आरसीबीने विजेतेपदाचा दुष्काळ संपवला
आयपीएलच्या 18 व्या हंगामात पंजाबचा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी व पंजाब किंग्ज यांच्यात संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. बंगळुरुनं रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आणि आरसीबी संघ पहिल्यांदा आयपीएल 2025 चा विजेता बनला. भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, यश दयाल यांच्या प्रभावी स्पेलच्या बळावर, बंगळुरुनं 190 धावांचा स्कोअर यशस्वीरित्या राखला आणि पंजाबचा 6 धावांनी पराभव केला.

१८ वर्षानंतर आयपीएलचे विराटचे स्वप्न पूर्ण…
दरम्यान, 2008 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला सुरुवात झाली. तेव्हापासून ही स्पर्धा अतिशय रंजक झाली आहे. तेव्हापासून आरसीबी संघानंही 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांना विजेतेपद पटकावतं आलं नाही. दुसरीकडे मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. केकेआर संघानं तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं पाच वेळा विजेतेपद जिंकलं आहे. परंतु आरसीबीला एकही विजेतेपद जिंकता आलेलं नव्हत. मात्र यावर्षी पहिल्यांदाच आरसीबी IPL विजतेपद पटकावलं आहे. आणि किंग कोहलीचे आयपीएल ट्राफी जिंकण्याचे १८ वर्षानंतर स्वप्न पूर्ण झाले आहे.