Devendra Fadnavis : आज समृद्धी महामार्गाचा अखेरच्या आणि पाचव्या टप्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण झाले. इगतपुरी ते ठाण्यातील आमणे अशा 76 किलोमीटरच्या मार्गाचं लोकार्पण करण्यात आले. त्यामुळं हा संपूर्ण महामार्ग सामान्य लोकांसाठी खुला झाला आहे. दरम्यान, इगतपुरीतील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा सोहळा पार पडला. याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने प्रवास केला.
एकनाथ शिंदेंच्या हातात स्टेअरिंग…
दरम्यान, सुरुवातील एकनाथ शिंदेंनी गाडी चालवत सारथ्यं केलं. तर यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवली. यावेळी मी मागच्या सीटवर मला गारगार वाटतंय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. यावेळी “आमची गाडी छान चालली आहे, काही काळजी करु नका..” अशी मिश्किल टिप्पणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महामार्गामुळं विकासाला चालना मिळेल…
दुसरीकडे समृद्धी महामार्गाचे देवंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. या महामार्गामुळं राज्याच्या विकासाला गती मिळेल, कृषी, पर्यावरण, रोजगार यांना चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आणि राज्याची एकोसिस्टीम आणखी मजबूत होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर हा महामार्ग होत असताना काहीनी विरोध केला होता. मात्र शेवटी हा महामार्ग झाला, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.