शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गट आक्रमक, उद्यापासून मराठवाडयात उभारणार शेतकऱ्यांचे जन आंदोलन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने आणि अमिषं दाखवली होती. तसेच घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे.

Thackeray group – सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. बळीराज सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकरी कर्जमाफी झाली नाही. या सर्व धरतीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, उद्यापासून म्हणजे 5 जून ते 12 जून कालावधीत मराठवाडयात शेतकऱ्यांचे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

क्या हुआ तेरा वादा?

दरम्यान, 5 जून ते 12 जून या कालावधीत शेतकऱ्यांचे जन आंदोलन उभारले जाणार असून, सरकारला क्या हुआ तेरा वादा? या शिषर्काखाली जाब विचारून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ज्येष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

घोषणांचा पाऊस व शेतकऱ्यांना अमिष…

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने आणि अमिषं दाखवली होती. तसेच घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनाचा जो विसर पडला आहे, त्याची आठवण करुण देण्यासाठी मराठवाड्यात शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. अशी माहिती ठाकरे गटातील नेत्यांनी दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News