‘रश्मी ठाकरेंच्या राजकीय हस्तक्षेपामुळे…’, शिवसेना का फुटली? भरत गोगावलेंनी थेटच सांगितले

शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाचे नेत्यांतून आम्ही शिवसेनेतून उठाव का केला. याच्यावर विविध आणि वेगवेगळे कारणे सांगितले जात होती. एकीकडे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे काँग्रेसच्या दावनीला बांधले होते.

Bharat Gogawale : एकनाथ शिंदेंनी मूळ शिवसेनेतून बंड केल्यानंतर आपण उठाव का केला? याची वेगवेगळी कारणे अद्यापपर्यंत सांगण्यात येत होती. मात्र आता बंडाचे कारण हे मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे हे होते असे सांगितले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत शिंदे गटाकडून वेगवेगळी कारणे सांगण्यात येत होती. मात्र आता मंत्री भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर आरोप केले आहेत. यामुळं पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपण्याची शक्यता आहे.

शिवसेना का फुटली?

दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाचे नेत्यांतून आम्ही शिवसेनेतून उठाव का केला. याच्यावर विविध आणि वेगवेगळे कारणे सांगितले जात होती. एकीकडे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे काँग्रेसच्या दावनीला बांधले होते. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी… हिंदुत्वसाठी शिवसेनेतून बंड केल्याचं शिंदेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना… आमदारांना निधी मिळत नव्हता. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधी डावलत होते, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे…

दुसरीकडे शिवसेनेतू बंड करण्याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे  आपण शिवसेनेतून बंड केले. आणि पहिल्यांदा आमदार झालेले आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पहिल्यांदाच आमदार आणि मंत्री त्यामुळे शिवसेनेतील जेष्ठ नेते नाराज झाले होते. त्यामुळेच आम्ही उठाव केला. असे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. आता भरत भोगावल्यांच्या या नवीन आरोपानंतर शिवसेना ठाकरेंकडून कोणते प्रतिउत्तर येते. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News