कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरेंचं सरकावर टीकास्त्र, व्यक्त केला संताप

राज ठाकरेंनी कुंडमळ्यातील तुटलेल्या पुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. नेमकं राज ठाकरेंनी काय म्हटलं, ते पाहू...

पुण्यानजीकच्या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवर आता राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी कुंडमळ्यातील तुटलेल्या पुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. नेमकं राज ठाकरेंनी काय म्हटलं ते सविस्तर समजून घेऊ…

राज ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र

पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 51 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणताही पर्यटक बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही. पण तरीही खबरदारी म्हणून आज सकाळपासूनच पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आता या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला सुनावले आहे.

ट्वीट करत व्यक्त केला संताप

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News