छत्तीसगढमध्ये 27 नक्षलीचा एनकाउंटर, एक जवान शहीद

मागील 7 दिवसात 31 नक्षलीवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले होते. पोलिसांनी काही दिवसापुर्वी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये कर्रेगुट्टा ऑपरेशनबाबत माहिती दिली होती. छत्तीसगढ़-तेलंगाना सीमेवर कर्रेगुट्टा जंगलात 24 दिवस चाललेल्या ऑपरेशन मध्ये 31नक्षलीवाद्यांना ठार मारण्यात आले.

Chhattisagadh – छत्तीसगढ़ मधील नारायणपुर जिल्हयतील अबूझमाड़ जंगलात बुधवार सकाळी सुरक्षाबल यांचे जवान आणि नक्षली यांच्यात चकमक झाली. यात 27 नक्षली यांना यमसदनी धाडले आहे. सर्व नक्षली यांचे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या नक्षलीमधे 1.5 करोड रुपये बक्षीस असलेला बसवा राजू याचाही सहभाग आहे.

एक जवान शहीद…

दरम्यान, सुरक्षा बल जवान आणि नक्षली यांच्यात झालेल्या चकमकीत 27 नक्षली ठार झाले असून, DRG (डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड) मधील एक जवान शहीद झाला आहे. ही चकमक नारायणपुर आणि बीजापुर जिल्हा या सीमेवर झाली. दरम्यान, सुरक्षा बल जवानांनी केलेले हे ऑपरेशन यशस्वी झाले असून, 27 नक्षलीना ठार मारण्यात जवानांना यश आल्याचे प्रदेशचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान, जो जवान शहीद झाला आहे. त्याला राज्य सरकार तर्फे आर्थिक मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

7 दिवसात 31 नक्षली ठार…

दुसरीकडे काही दिवसापुर्वी अनेक नक्षलीवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले होते. यानंतर आज सकाळी 27 नक्षलीवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे. त्यामुळे मागील 7 दिवसात 31 नक्षलीवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले होते. पोलिसांनी काही दिवसापुर्वी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये कर्रेगुट्टा ऑपरेशनबाबत माहिती दिली होती. छत्तीसगढ़-तेलंगाना सीमेवर कर्रेगुट्टा जंगलात 24 दिवस चाललेल्या ऑपरेशन मध्ये 31नक्षलीवाद्यांना ठार मारण्यात आले. यात 16 महिला आणि 15 पुरुष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या नक्षलीमधे 1.5 करोड रुपये बक्षीस असलेला बसवा राजू याचाही सहभाग आहे. त्यामुळे ही मोठी कारवाई समजली जाते.


About Author

Astha Sutar

Other Latest News