ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना भारत आणि पाकिस्तानसोबतचे सर्व करार रद्द करण्यास सांगून दोन्ही देशांमधील युद्ध रोखल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान युध्द नेमके कुणामुळे थांबले? हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे, त्यामुळे नेमकं यामागील सत्य काय, हे जाणून घेण्याची ओढ सर्वांनाचा आहे.
हो, मीच युध्द थांबवले – ट्रम्प
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आम्ही भारत आणि पाकिस्तानसोबत काही उत्तम काम केले आहे. कदाचित ते अणुहल्ल्याकडे वाटचाल करत असेल. आम्ही खूप काम केले आहे. भारत-पाकिस्तान युद्ध मी थांबवले. मला माहित नाही की यापेक्षा जास्त काम करणारा राष्ट्राध्यक्ष कधी झाला आहे?”. असे म्हणत ट्रम्प यांनी आपलीच पाठ थोपटून घेतल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

युध्द का थांबले, सत्य काय?
भारत आणि पाकिस्तानमधील लढाई थांबवण्यास मदत केली असे ट्रम्प वारंवार सांगतात. मात्र भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे की, दोन्ही सैन्याच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये थेट चर्चेनंतर पाकिस्तानशी संघर्ष संपवण्याचा करार झाला. त्यामुळे हे युध्द अंतर्गत समजूतीनेच थांबले असल्याची शक्यता अधिक आहे.
सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानला लष्करी संघर्ष संपवण्याचा आवाहन केलं होतं. तसेच संवाद आणि कुटनीतीच्या मार्गाने चर्चा करुन सर्व वाद सोडवण्याचे आवाहने केले. तसेच यासाठी सौदी अरेबिया देखील प्रयत्न करत असल्याचे रियाधने म्हटले होते. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल-अल जुबैर यांनी 8-9 मे रोजी भारत पाकिस्तान दौरा केला होता. हा दौर दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी होता, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. त्यामुळे हे युध्द थांबण्यात सौदी अरेबियाची भूमिका देखील महत्वाची ठरली.