Maharashtra Rain – मे महिन्यात अंतिम आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती, ती पावसाची संततधार कायम आहे. राज्यात आता जून महिन्या संपत आला आहे. चार दिवसात जुलै महिना सुरु होईल. यावर्षी पावसाने खूप लवकर सलामी दिली. सध्या राज्यात सर्वंत्र समाधानकारक पाऊस बरसत आहे. तर मागील २४ तासात पडलेला पावसाचा अहवाल राज्याच्या आपत्ती विभागाने जाहीर केला आहे. या पावसाच्या आपत्तीमुळं मृत्यू व जखमीच्या घटना घडल्या आहेत.
मागील २४ तासात सर्वात पाऊस कुठे?
– वाशिम ५२.८ मि. मी
– बुलढाणा ४४.८ मि. मी
– वर्धा ३९.२ मि. मी
– जळगाव २८.२ मि. मी
– रायगड २६.७ मि. मी

पावसामुळं मृत्यू व जखमींची संख्या किती?
दुसरीकडे गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सततच्या पावसामुळं मृत्यू आणि जखमींच्या घटनाही घडल्या आहेत. विविध कारणामुळं म्हणजे झाड पडून, वादळी वाऱ्याने शेड पडून, झाड पडून, पुरात वाहून, पाण्यात पडून, वीज पडून 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अशी माहिती राज्याच्या आपत्ती विभागाने दिली आहे.
कोकण आणि घाट माथ्यावर ऑरेज अलर्ट…
दरम्यान, सातारा जिल्ह्यात निरा नदीत माउलीच्या पादुका शाही स्नानासाठी घेऊन गेले असताना एका बुडणाऱ्या व्यक्तीला रेस्क्यू टीमला वाचविण्यात यश आले आहे. तर विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील देवळांमधील दिगडोह येथे तीन शाळकरी मुले पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती. पुढील २४ तासासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट या ठिकाणी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला INCOIS तर्फ २८ जूनपर्यंत, ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.