वाईट जीवनशैली आणि असंतुलित आहार पद्धतीमुळे सध्या मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, आणि ही बाब निश्चितच चिंतेची आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये सकाळच्या वेळेस रक्तातील साखरेची पातळी वाढते, हे सामान्यपणे पाहायला मिळते. मात्र, काही सोप्या सवयी नियमित पाळल्या तर रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येऊ शकते.
रात्री या गोष्टी टाळा
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे. रात्री जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः जर तुम्ही रात्री भात खात असाल किंवा जेवणानंतर गोड खात असाल, तर ही सवय तातडीने बदलली पाहिजे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रोटीन व फायबरयुक्त डाळी आणि हिरव्या भाज्या खाणे फायदेशीर ठरते.

व्यायाम गरजेचा आहे
जर तुम्ही मधुमेहासारख्या ‘सायलेंट किलर’ आजाराच्या विळख्यात अडकले असाल, तर दररोजच्या दिनचर्येत व्यायाम सामील करणं गरजेचं आहे. दररोज १५-२० मिनिटांची चाल किंवा नियमित योगासने केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यासोबतच नियमितपणे ब्लड शुगर लेव्हलची मॉनिटरिंग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
७-८ तासांची पुरेशी झोप घ्या
जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर रक्तातील साखर जास्त दिसत असेल, तर कदाचित रात्री नीट झोप न लागल्यामुळेही हे होत असेल. अशा वेळी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर या सर्व उपायांनीही साखरेच्या पातळीत फरक पडत नसेल, तर डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी.