State Rain – मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मे महिन्यातच विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. हा पाऊस सरासरीपेक्षा ११ पट जास्त असल्याचे हवामाने विभागने म्हटले आहे. मे महिन्यात सरासरी पेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला. त्यामुळं धरण आणि नदीमध्ये जलसाठा वाढला. उन्हाळ्यात विहिर भरल्या आहेत, नदी नाल्यांना पूर आला. मात्र गेल्या आ़वड्यापासून पावसाने उसंत घेतली असून, अधूनमधून पाऊस बरसत असतो.
कोकणात यलो अलर्ट…
मुंबईसह कोकणात पुढील काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरणासह व मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचे अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे.

हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस
दरम्यान, पुढील तीन-चार दिवस राज्यातील विविध भागात म्हणजे कोकणातील पालघर, ठाणे, आणि मुंबईत पुढील काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरणासह व मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, गेल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र आता पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पुणे जिल्ह्यातही या काळात पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पेरणीची घाई करु करा…
सध्या पेरणी करण्याची घाई करु नका, सध्याचा पाऊस शेतीसाठी अनुकूल नाही, १० तारखेनंतर पावसाची स्थिती पाहूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलं आहे. तर सध्याच्या पावसामुळं पाण्याचा साठा झाला आहे, पण शेतीसाठी योग्य नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. मे महिन्यात यंदा सरासरीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी १४.४ टक्के आहे. परंतु, विशेष म्हणजे मे महिना हा उन्हाळाच महिना म्हणून ओळखले जाते.