ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उद्या म्हणजेच बुधवारी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विविध देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून या बाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे, नेमका कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार, त्याचबरोबर पाणीपुरवठा नेमका सुरळीत कधी होणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
कुठे पाणीपुरवठा बंद, कारण काय?
#thane #thanecity #thanekars #thanecityofficial pic.twitter.com/gPDK32UrAx
— Thane Municipal Corporation – ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) May 19, 2025
ठाणेकरांना होणार मनस्ताप
ठाणे शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या पाणीपुरवठा बंद ठेवण्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, स्वच्छता राखण्यास अडचणी, तसेच दैनंदिन जीवनातील इतर अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. या समस्येवर उपाय म्हणून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण करणे, अनधिकृत नळ जोडण्या रोखणे, तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे. यामुळे ठाणेकरांना होणाऱ्या मनस्तापात काही प्रमाणात कमी होऊ शकते.