महाराष्ट्रामध्ये आगामी काळात ३० लाख घरे उपलब्ध करणार, सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाचा पुढाकार

राज्य शासनाच्या निधीतून प्राप्त बसेसचे आणि अंबाझरी दहन घाटाकडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पणासह मेहंदी बाग उड्डाणपुलाखाली, दही बाजार उड्डाणपुलाखाली, सक्करदरा उड्डाणपुलाखाली, दिघोरी उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणाचे काम व अंतराळवीराचे भित्तिचित्र आदींचे लोकार्पण करण्यात आले. 

State Government – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घरे तयार झाली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. त्यामुळं आता नवीन अडीच कोटी घरांचे बांधकाम सुरू झालेले आहे. तर महाराष्ट्रामध्येही ३० लाख घरे उपलब्ध होणार आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वप्ननिकेतन’ सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

विविध विकास कामांचेही लोकार्पण

दरम्यान, नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वांजरा येथील जागेवर बांधण्यात आलेले 480 सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सदनिकांच्या किल्ली सुपूर्द करण्यात आल्या. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मनपाने अतिशय उत्तम सदनिका तयार केल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

विकासासह पर्यावरणाचा समतोल राखणे महत्वाचे

नागपूर हे हरित शहरांच्या यादीत असून येथील विकासासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक अशा ई बसेस देखील नागरिकांच्या सेवेत उपलब्धता करून दिल्या आहेत. नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा कमीत कमी उपयोग करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असेही फडणवीस यावेळी म्हणाले. शहरातील सहा ही विधानसभा क्षेत्र निहाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान एक हजार घरांच्या इमारती उभारण्यात याव्या. जेणेकरून नागरिकांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना देखील मालकी हक्काचे पट्टे दिले जात असून, पुढील काळात सर्वाना पक्के घरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


About Author

Astha Sutar

Other Latest News