जेव्हा प्रत्येक भक्त देवाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतो तेव्हा तो घंटा वाजवून पूजा सुरू करतो. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवावी की नाही? मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवणे शुभ की अशुभ हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या..
मंदिरात प्रवेश करताना

मंदिरातून बाहेर पडताना
मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवणे योग्य नाही. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवणे शुभ मानले जाते, कारण यामुळे देवाचे लक्ष वेधले जाते, पण बाहेर पडताना घंटा वाजवल्यास सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, असे मानले जाते, त्यामुळे ते टाळणे योग्य आहे. मंदिरातील घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि जिवाणू नष्ट होतात, असे मानले जाते, पण बाहेर पडताना घंटा वाजवल्यास, याचा उपयोग होत नाही.
मंदिरात घंटा का वाजवली जाते?
मंदिरात घंटा वाजवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या, घंटा वाजवून देवाला आपल्या आगमनाची माहिती दिली जाते, तसेच वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वैज्ञानिक दृष्ट्या, घंटेचा आवाज वातावरणातील हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्म कण नष्ट करतो आणि मन एकाग्र करण्यास मदत करतो. घंटेचा नाद मनाला शांत करतो आणि एकाग्रता वाढवतो, ज्यामुळे भक्तांना ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. घंटेच्या आवाजाने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे उत्साह आणि आनंदी वातावरण तयार होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)