महिला उन्नती, सुरक्षितता व सशक्तीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ मिळणार असून, पाल्यांना शिक्षण, कुटुंबाला स्थर्य पर्यायाने गावाची समृद्धी होण्यास मदत होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Ajit Pawar : पुरोगामी महाराष्टाने नेहमीच महिलांचा आदर केला आहे. देशाला आत्मनिर्भर करतांना महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, याकरीता राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध लोककल्याणकारी, क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारच नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून, त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. महिलांचे सन्मान व प्रगती ही सामाजिक जबाबदारी असण्यासोबतच महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

महिलांसाठी क्रांतीकारक निर्णय…

दरम्यान, महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध लोककल्याणकारी, क्रांतिकारी निर्णय आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वतंत्र महिला धोरण, वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, शासकीय सेवेत ३३ टक्के राखीव जागा, स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण, एसटी बस भाड्यात ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षण आदी निर्णय घेतले आहेत.

महिलांसाठी विविध योजना…

राज्यात ७ लाख नवीन बचतगटांची स्थापना करण्यासोबतच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी राज्याने महत्वाचे निर्णय व योजना आणल्या आहेत. यामध्ये नमो महिला सक्षमीकरण अभियान, पिंक महिला रिक्षा योजना, महिलांच्या उन्नतीकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, लखपती दिदी, राजमाता माँ जिजाऊ गृहस्वामीनी योजना आदी योजना आणल्या आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News