Shivsena 59th Anniversary : हिंदुरुदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. आज शिवसेनेला 59 वर्ष पूर्ण होताहेत. या 59 वर्षात पूलाखालून बरेच पाणी गेले. शिवसेनेनं अनेक संकटं, वादळं झेलली. तसेच अनेक मोठे नेते शिवसेनेला सोडून गेले. पण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी सेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड केले. ४० आमदारसह संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला. यानंतर शिवसेनेचे दोन शकलं पडली आहेत. त्यामुळं आज १९ जून रोजी शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे केले जाताहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून वर्धापन दिन साजरे होताहेत.
शिवसेनेचा इतिहास कसा आहे…
दरम्यान, शिवसेनेच्या स्थापनेनंतर 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेच्या पहिला दसरा मेळावा साजरा झाला. 1968 रोजी शिवसेनेला मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला. 1971 रोजी शिवसेनेचा पहिला महापौर झाला. 1972 रोजी प्रमोद नवलकर विधानसभेत गेले. 1975 रोजी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. 1980 रोजी शिवसेनेने काँग्रेसला मदत केल्यामुळे काँग्रेसनं शिवसेनेला विधानपरिषदेवर दोन जागा दिल्या होत्या. यानंतर 1984 रोजी शिवसेनेनं भाजपासोबत युती केली. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार आले. मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले. 2014 रोजी भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षाची युती तुटली. यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी मोठे बंड केले.

एकनाथ शिंदेंचा पक्षावर दावा….
दुसरीकडे शिवसेना ही मराठी माणसासाठी आणि न्याय हक्कासाठी जरी असले तरी याच शिवसेनेतून मराठी माणूसच बंड करत गेला. त्यामुळं सेनेला एकप्रकारे बंडाचा शाप आहे. शिंदेंनी ४० आमदारांसह खरी शिवसेना ही आपल्याकडेच असल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडूण आले. तर एकनाथ शिंदे यांचे ७ खासदार आले. पण दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्ष, व चिन्ह हा वाद कोर्टात सुरू होता. मात्र कोर्टाने शिवसेना पक्ष, व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं आहे. त्यामुळे अधिकृत शिवसेना ही सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे.
दोन वर्धापन, कोण बाजी मारणार…
बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला आज 59 वर्ष होताहेत. पण सध्य़ा शिवसेनेची दोन शकलं पडली आहेत. हेच मराठी माणसांला मुळात पटलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच धरतीवर दोन शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरा होत आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून षण्मुखानंद येथे वर्धापन दिन साजरा होतोय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीत साजरा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन शिवसेना पक्षातून कोण बाजी मारणार, कुणीकडे अधिक गर्दी होते? कोणाचे भाषण गाजणार? आणि कोण कोणावर तोफ डागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.