अक्षय्यतृतीयेच्या दिवशी बाल विवाहांवर ‘वाॅच’, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

बैठकीत बाल विवाह रोखण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेषतः रेड फ्लेग (स्कूल ड्रोप आउट) मुलींकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली.

पुणे : अक्षय्यतृतीया सणानिमित्त (३० एप्रिल) आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, तसेच संबंधित यंत्रणेने या विवाह सोहळ्यात वधूचे वय 18 वर्षे व वराचे वय 21 वर्ष असल्याची खात्री करावी, असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हा प्रशासनाकडून बाल विवाहांवर वाॅच राहणार आहे.

अक्षयतृतीया सणानिमित्त आयोजित सामूहिक विवाह बाल विवाहाची शक्यता लक्षात घेता महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी अक्षयतृतीया निमित्त होणारे बालविवाह रोखण्या संदर्भात ऑनलाइन बैठक घेतली आहे.

बाल विवाह रोखण्यासाठी निर्देश

या बैठकीत बाल विवाह रोखण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेषतः रेड फ्लेग (स्कूल ड्रोप आउट) मुलींकडे विशेष लक्ष द्यावे. “बालिका” या शाळा बाह्य होणार नाहीत अथवा त्या बालविवाहामध्ये अडकणार नाहीत याची प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षकांनी दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

ग्राम बाल संरक्षण समितीला आदेश

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 या कायद्याच्या अंमलबजावणी करिता गठीत बाल विवाह प्रतिबंधित अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्राम बाल संरक्षण समिती यांना अक्षयतृतीया या मुहूर्तावर बालविवाह होत असल्यास ते रोखण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या शहरात, गावात बाल विवाह होणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी. याकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल.

…तर कडक करावाई होणार

तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समिती व विवाहाशी संबंधित मंडप डेकोरेटर्स, विवाह कार्य करणारे धार्मिक गुरु, मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक, बँड पथक वाफ, हॉटेल व्यवस्थापक, केटरर्स आदी व्यावसायिक यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्यातील तरतुदींचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे, जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. बालविवाहासाठी पुढाकार घेण्याऱ्यांवर कडक करावाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News