‘मुस्लिमांना शिक्षण, आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध’, अजित पवारांचा बैठकीत शब्द

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

मुंबई : वक्फ विधेयेकाच्या मंजुरीनंतर मुस्लिम समाजात नाराजी आहे. ही नाराजी महायुती सरकारकडून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे विधेयक मुस्लिम बांधवांच्या कसे फायद्याचे आहे हे पटवून देण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील वक्फ संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली.

या बैठकीत राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीला या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवराछत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवणार

अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यवाहीसाठी सूचना

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन, निधी वितरण, शिक्षण व इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी सूचना देत वक्फ मंडळाच्या समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News