99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात; 32 वर्षांनंतर साताऱ्याला मान

99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संनेलन साताऱ्याला होणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्याला हा बहुमान मिळत आहे. त्यामुळे सातारकर साहित्यिकांमध्ये विशेष आनंद पाहायला मिळत आहे.

सातारा: 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार आहे. 32 वर्षानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन होणार आहे. सातारामधील हे 4 थे साहित्य संमेलन आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे 99 वे साहित्य संमेलन पार पडणार आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीने 5 ते 7 जून रोजी निमंत्रक स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.

पाठपुराव्यानंतर साताऱ्याला बहुमान

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, “साताऱ्याला 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती . ”

साताऱ्यात संमेलनाचं स्थळ कोणतं?

नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की 1993 साली 66वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत.

साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे .1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते . 1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्या आता झाले होते. त्यामुळे यंदा सातारकरांना आणि इथल्या साहित्यिकांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे, असं बोललं जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News