कांदा स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा कापताना अश्रू येण्याचे कारण म्हणजे कांद्यात असलेले विशिष्ट रासायनिक पदार्थ हवेत मिसळून डोळ्यात जातात आणि डोळे संवेदनशील होतात. कांदा कापल्यावर डोळ्यातून पाणी का येते हे जाणून घेऊयात…
कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते?
कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्याचं कारण म्हणजे कांद्यात असलेले विशिष्ट रासायनिक पदार्थ. कांद्यात ‘सिन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साइड’ नावाचे एक रसायन असते. जेव्हा कांदा चिरला जातो, तेव्हा हे रसायन हवेत सोडले जाते आणि डोळ्यांच्या ‘लॅक्रिमल ग्रंथी’ उत्तेजित करते. हा वायू डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांना उत्तेजित करतो आणि त्यामुळे अश्रू येतात.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी काही उपाय
कांदा थंड पाण्यात ठेवा
कांदा कापण्यापूर्वी काही मिनिटे थंड पाण्यात ठेवल्याने रासायनिक प्रक्रिया कमी होते आणि डोळ्यात पाणी येण्याची शक्यता कमी होते.
कांदा चिरण्यापूर्वी डोळ्यांना थंड पाणी लावा
कांदा चिरण्यापूर्वी डोळ्यांवर थंड पाणी लावल्याने डोळ्यांची संवेदनशीलता कमी होते आणि डोळ्यात पाणी येण्याची शक्यता कमी होते.
व्हिनेगरचा वापर करा
कांद्यातील एन्झाइममुळं डोळे जळजळतात ही जळजळ थांबवण्यासाठी कांदा कापण्यापूर्वी व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवावा.
लिंबाचा वापर
कांदा कापताना तुम्ही लिंबाचा वापरही करु शकता. कांदा कापण्यापूर्वी चाकूवर थोडा लिंबाचा रस लावावा. त्यामुळं कांद्यातील एन्झाइमचा डोळ्यांवर परिणाम होणार नाही आणि जळजळही कमी होईल.
कांदा मुळाच्या बाजूने कापा
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)