पावसाळा सुरू झाला आहे, या ऋतूत आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, विशेषतः आपल्या फोनची. तुम्हाला अनेकदा ही भीती असेल की जर तुम्ही घराबाहेर पडलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तर तुमचा फोन भिजू शकतो, आणि जर तुमचा फोन ओला झाल्यामुळे खराब झाला तर हा पाऊस तुमच्यासाठी महागात पडू शकतो. पावसात फोन भिजल्याने फोनमध्ये पाणी शिरण्याची भीती सर्वांनाच असते आणि यामुळे फोन खराब होऊ शकतो, मग तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते, अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा फोन कसा दुरुस्त करायचा याची काळजी वाटत असेल. पावसाळ्यात काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा फोन भिजण्यापासून वाचवू शकता. तसेच, तुमचा फोन ओला झाल्यास खराब होण्यापासून वाचवू शकता. जाणून घ्या…
वॉटरप्रूफ पाउच वापरा
पावसात तुमचा फोन भिजवू नये, यासाठी वॉटरप्रूफ पाउच वापरा किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. वॉटरप्रूफ पाउच किंवा झिपलॉक बॅग वापरल्यास, फोन पाण्यापासून सुरक्षित राहतो. वॉटरप्रूफ पाउच आणि झिपलॉक बॅग परवडणारे पर्याय आहेत, जे तुम्हाला जास्त खर्च न करता फोनला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. वॉटरप्रूफ पाउच किंवा झिपलॉक बॅग वापरल्यास फोनला पाणी लागण्याची शक्यता कमी होते. पावसाच्या दिवसात फोन सेफ ठेवण्यासाठी वॉटर प्रूफ पाउच स्वत:कडे ठेवा. पाउच हवा बंद असावा आणि पूर्णपणे सील असेल याची काळजी घ्या.

पावसापासून दूर राहा
शक्य झाल्यास, पावसात फोन वापरणे टाळा. पावसाच्या थेट संपर्कात फोन आला, तर तो खराब होऊ शकतो. पावसात फोन वापरणे टाळणेच चांगले, कारण थेट पावसाच्या संपर्कात आल्यास फोन खराब होऊ शकतो. पाणी फोनमधील सर्किट बोर्ड आणि इतर भागांमध्ये शॉर्ट सर्किट निर्माण करू शकते, ज्यामुळे फोन पूर्णपणे खराब होऊ शकतो. पावसाच्या वेळी फोनचा वापर टाळल्यास, तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो.
वॉटरप्रूफ केस लावा
पावसात फोन भिजवू नये यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ केस लावू शकता. तुम्ही वॉटरप्रूफ केस वापरल्यास, तुमचा फोन अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील.
फोन बंद करा
जर तुमचा फोन चुकून पावसात भिजला तर फोन ताबडतोब बंद करा. जर फोन चालू राहिला तर आत पाणी शिरल्याने फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि फोन खराब होऊ शकतो. पाणी शॉर्ट सर्किट करू शकते आणि फोनला नुकसान होऊ शकते.
फोन तांदळात ठेवा
जर चुकून तुमचा फोन भिजला तर तो आधी कॉटनच्या कपड्यानं पुसा आणि त्याला व्यवस्थित सुकू द्या. किंवा तांदळाच्या डब्ब्यात तुमचा फोन ठेवा. जर फोन भिजला, तर तो तांदळात 24 तास ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतो, त्यामुळे फोन तांदळात ठेवल्यास तो कोरडा होईल.
फोन चार्जिंगला लावू नका
तुमचा फोन जर पावसात भिजला असेल, तर तो चार्जिंगला लावू नये. जर USB पोर्टमध्ये पाणी असेल, तर फोन चार्जिंगला लावल्यास ते नुकसान करू शकते. फोन चार्जिंगला लावण्याआधी, फोनच्या पोर्टमध्ये पाणी आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)