Water supply – मुंबईकरांच्या पाण्याबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील काही भागात सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा बंद राणार आहे. जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळं दोन दिवस पाणीपुरवठा बंद राणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
कोणत्या कारणामुळं पाणीपुरवठा बंद…
दरम्यान, सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत हे काम जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे. आणि ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळं पाणीपुरवठा बंद राणार आहे.

कोणत्या विभागात पाणीपुरवठा बंद…
दुसरीकडे आर दक्षिण विभाग – ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) (दिनांक २ जून २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. तसेच सोमवार, दिनांक २ जून दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून सकाळी ७.३० वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.