Mumbai Metro – रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाने मुंबईची तुंबई केली. तसेच मुंबई आणि उपनगरात देखील दमदार पाऊस झाला. त्यामुळं मुंबईतील सखल भागात ठीक-ठिकाणी पाणी तुंबले. या पावसाच्या पाण्यामुळं मुंबईची तुंबई झाली. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक व मेट्रो वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता पावसाचे पाणी शिरल्याने बंद असलेले भूमिगत मेट्रोचे आचार्य अत्रे चौक स्टेशनबाबत एक अपडेट समोर येत आहे.
मेट्रो स्टेशन १-२ दिवसात सुरू होणार…
दरम्यान, पावसाने मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर रेल्वे वाहतूकीवर जसा परिणाम झाला, तसाच मुंबईतील भूमिगत अॅक्वा मेट्रोवर देखील दिसून आला. मुसळधार पावसामुळं सोमवारी मुंबईतील भूमिगत अॅक्वा मेट्रो लाईनमध्ये पाणी शिरले होते. वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. ते स्टेशन आजपर्यंत बंदच आहे. पण सध्या या स्टेशनचे काम सुरु असून, पूढील एक दोन दिवसात आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन सुरु होईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

सहापैकी २ प्रवेशद्वरात पाणी शिरले…
दुसरीकडे भूमिगत अॅक्वा मेट्रोचे उद्घाटन नुकतेच केले होते. पण काही दिवसातच पाणी शिरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनला एकूण सहा प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी दोन प्रवेशद्वारांचे काम सुरु होते. पण अचानक आलेल्या पावसामुळं तिथे पाणी शिरले, आणि हे पाणी स्टेशनवर आले. पण सध्या येथले काम सुरु आहे. पण भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यात येत आहे. आणि पुढील १-२ दिवसांत हे स्टेशन प्रवाशांसाठी खुले होईल, असं मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले आहे.