तुमच्या स्वयंपाकघरात ‘या’ वस्तू आहेत का? आजच काढून टाका, जाणून घ्या परिणाम…

स्वयंपाकघर ही जागा अतिशय सुंदर जागा असते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत.

घराच्या बांधकामापासून ते घरात कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी, या सर्व गोष्टींचे वास्तुशास्त्रात वर्णन केले आहे. वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी काही नियम सांगितले आहेत. आजआपण स्वयंपाकघराबद्दल जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, या गोष्टी घराच्या समृद्धी आणि शांतीवर परिणाम करतात. जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टींमुळे घरात गरिबी, आर्थिक परिस्थिती आणि कलह निर्माण होतात. म्हणून, आपण आपल्या स्वयंपाकघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये याची खूप काळजी घेतली पाहिजे.

तुटलेली भांडी

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात तुटलेली भांडी किंवा इतर वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबात वादविवाद वाढू शकतात.स्वयंपाकघरात कप, ताट, तवा किंवा इतर कोणतेही भांडे तुटले तर ते ताबडतोब काढून टाकावे. तुटलेली भांडी दुर्दैव आणि गरिबी वाढवतात. तुटलेली भांडी घरात अशांतता आणि कलह दर्शवितात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.  तुटलेली भांडी वापरून तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तुटलेली भांडी घरात ठेवल्यास ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि वास्तुदोष निर्माण करतात. यामुळे कुटुंबात भांडणं आणि आर्थिक समस्या येऊ शकतात. 

झाडू

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात झाडू ठेवणे शुभ मानले जात नाही. स्वयंपाकघर हे अन्न आणि ऊर्जा निर्मितीचे स्थान आहे, त्यामुळे ते स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, पण झाडू तिथे ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. स्वयंपाकघर हे अन्न आणि आरोग्याशी संबंधित आहे, त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. झाडू तिथे ठेवल्यास अन्न आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. असं म्हणतात की स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरात धनधान्याची कमतरता भासते. 

प्लास्टिकची भांडी

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात प्लास्टिकची भांडी ठेवणे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरात कोणतीही गोष्ट ठेवण्याकरता प्लास्टिकचे डबे किंवा भांडे यांचा वापर करू नये. जे आरोग्यावर परिणाम करू शकतात. प्लास्टिकमुळे राहु दोष होऊ शकतो. प्लास्टिकच्या भांड्यात अन्न किंवा पाणी ठेवल्यास, ते नैसर्गिकरित्या ऊर्जा कमी करतात, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

स्वयंपाकघरात आरसा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा ठेवणे योग्य मानले जात नाही, असे म्हटले जाते. स्वयंपाकघर हे अन्न आणि ऊर्जा यांचे केंद्र असते, आणि आरसा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर कधीही करू नये. त्यामुळे जीवनातील अडचणी वाढतात.

स्वयंपाकघरात देव्हारा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात देव्हारा किंवा देवाचे चित्र ठेवू नये. स्वयंपाकघरात देव्हारा असणे अशुभ मानले जाते, कारण येथे अन्न शिजवले जाते आणि देव-देवतांच्या पूजेसाठी योग्य वातावरण नसते. स्वयंपाकघरात देव्हारा किंवा देवाचे चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि घरात भांडणे होऊ शकतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News