वास्तु नियमांनुसार, स्वयंपाकघरासाठी काही नियम आहेत, ज्यांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी राहते. घराच्या स्वयंपाकघराबद्दल वास्तुशास्त्रातही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. असे केल्याने तुम्हाला कधीही नुकसान सहन करावे लागणार नाही. अनेक वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरात काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरात पैसा राहत नाही. स्वयंपाकघरात, वास्तुनुसार, काही भांडी उलटी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, तवा, कढई यांसारखी भांडी उलटी ठेवू नये जाणून घेऊया स्वयंपाकघराशी संबंधित काही वास्तू नियम…
तवा उलटा ठेवू नये
तवा स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरला जातो. तवा उलटा ठेवल्यास घरात सुख-समृद्धी कमी होऊ शकते. तवा उलटा ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. चुकूनही तवा उलटा ठेऊ नये घराच्या सुख समृद्धी मध्ये अडथळे निर्माण होतात.

कढई उलटी ठेवू नये
स्वयंपाकघरात कढई कधीही पालथी ठेऊ नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. कढई किंवा तवा वापरल्या नंतर भांडी खरकटी ठेऊ नये त्यामुळे सुख शांती भंग होते. यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगतीही थांबू शकते. घरात कलह आणि अशांतता वाढू शकते. कढई हे अन्नपूर्णा आईचे आवडते भांडे मानले जाते, त्यामुळे घरात ती कधीही उलटी ठेऊ नये. कढई किंवा तवा वापरल्या नंतर गॅस वर रिकामा ठेऊ नये. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वयंपाकघरात गॅस वर रिकामी कढई ठेवावी लागली तर त्यावर थोडे मीठ शिंपडा. मान्यतेनुसार, मीठ नकारात्मक ऊर्जा शांत करण्यास मदत करते.
भांडी या दिशेला ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असता तेव्हा तवा आणि कढई उजव्या बाजूला ठेवावी. स्वयंपाकघरात भांडी ठेवताना, वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला ठेवणे आणि ती स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. भांड्यांची दिशा आणि त्यांची स्थिती सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)