भारतातील रहस्यमयी मंदिरांपैकी एक आहे पुरीचे जगन्नाथ मंदिर, जाणून घ्या रहस्य

ओडिशातील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरात भाऊ बलदौ आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत बसलेल्या भगवान कृष्णाशी अनेक रहस्ये जोडलेली आहेत. हे मंदिर अतिशय चमत्कारिक आहे.

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी येथे रथयात्रा आयोजित केली जाते.या काळात, भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र तीन वेगवेगळ्या रथांवर स्वार होतात. जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर येथे आहे, जिथे दररोज देवासाठी ५६ पदार्थ बनवले जातात. येथून कोणताही भक्त कधीही रिकाम्या हाताने परतत नाही. ओडिशामध्ये असलेले भगवान जगन्नाथाचे मंदिर रहस्य आणि चमत्कारांनी भरलेले आहे. येथी मूर्तींमध्ये एक विलक्षण गोष्ट आहे. असे मानले जाते की या मूर्तींमध्ये आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते!चला तर मग, जाणून घेऊया भगवान जगन्नाथाच्या मूर्तींचं रहस्य आणि त्यामागची रंजक कथा काय आहे.

श्रीकृष्णाचे हृदय अजूनही धडधडते

पुरी येथील जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे हृदय आजही धडधडते, अशी श्रद्धा आहे. दर १२ वर्षांनी मंदिरातील मूर्ती बदलल्या जातात, तेव्हा हे हृदय नवीन मूर्तीत ठेवले जाते, असे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा आपला देह त्याग केला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या शरीराचे इतर भाग पंचतत्त्वात विलीन झाले, परंतु त्यांचे हृदय आजही सुरक्षित आणि जिवंत आहे असे मानले जाते. हे हृदय भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये असून ते आजही धडधडते असेही म्हणतात.

12 वर्षांनी मूर्ती बदलतात

पुरीतील जगन्नाथ मंदिरातील मूर्ती, दर 12 वर्षांनी बदलल्या जातात, या प्रक्रियेला ‘नवकलेवर’ म्हणतात. या दरम्यान, जुन्या लाकडी मूर्तींऐवजी नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. ही एक प्राचीन परंपरा आहे, ज्यामध्ये जगन्नाथ, बलभद्र, आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती बदलल्या जातात. मूर्ती बदलताना, संपूर्ण शहराची वीज बंद केली जाते आणि अंधार केला जातो. एकाच पुजाऱ्याला मंदिरात प्रवेश दिला जातो, ज्याला मूर्ती बदलायच्या आहेत. पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टीही बांधली जाते. हातावर हातमोजे घातले जातात. त्यानंतर मूर्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवल्या जातात, पण एक गोष्ट अशी आहे जी कधीही बदलत नाही, ती म्हणजे ब्रह्म द्रव्य. जुन्या मूर्तीतून ब्रह्म पदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. असे मानले जाते की हा पदार्थ पाहणाऱ्या व्यक्तीचे डोळे जातात किंवा तिचा मृत्यूही होऊ शकतो, त्यामुळे पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून हे काम करतात. या प्रक्रियेतील अनेक गोष्टी रहस्यमय मानल्या जातात आणि त्या आजही गूढ आहेत. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News