शास्त्रात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मग्रंथांमध्ये अत्यंत शुभ मानले गेले आहे. झोपेतून जागे होण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने व्यक्तीला शक्ती, ज्ञान, सौंदर्य आणि बुद्धी प्राप्त होते. ब्रह्म मुहूर्तामध्ये आपली दिनचर्या सुरू केल्यास सकारात्मक ऊर्जा विकसित होते, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते.
ब्रह्म मुहूर्ताची वेळ
रात्रीच्या शेवटच्या घटकेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ब्रम्ह मुहूर्ताचा काळ मानवासाठी जागृत होण्याचा सर्वोत्तम मानला जातो. या कालावधीत जागे झाल्याने शरीर सुदृढ राहते, आजार दूर राहतात आणि आरोग्य चांगले राहते असे मानले जाते. तसेच ब्रह्म मुहूर्तावर उठून देवाची पूजा केल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपाही प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे.

रात्रीच्या शेवटच्या प्रहरानंतरच्या आणि सूर्योदयापूर्वीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. यावेळी केलेल्या देवपूजेचे लवकर फळ मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजेही उघडले जातात.
ब्रह्म मुहूर्तामध्ये या गोष्टी केल्याने तुम्हाला यश मिळेल
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वीचा काळ अतिशय शुभ मानला जातो. असे म्हणतात की यावेळी वातावरण अतिशय शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेले असते. असे म्हणतात की, सकाळी फेरफटका मारल्याने शरीरात संजीवनी शक्तीचा संचार होतो. ब्रह्म मुहूर्ताचा वारा अमृतसारखा आहे. या वेळी उठून देवाची पूजा केल्याने मनुष्याला शुभ फल प्राप्त होते. अशा वेळी जागरण केल्यानं आजार दूर राहतात आणि आरोग्य चांगलं राहतं. ब्रह्म मुहूर्तावर उठून पूजा केल्यानं देव प्रसन्न होतो आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो. शास्त्रानुसार प्राचीन काळापासून ऋषीमुनी यावेळी उठून स्नान वगैरे करून देवपूजेत मग्न असतात. हा काळ देवांचा काळ मानला जातो. या वेळी देवांचे आगमन होते, अशी श्रद्धा आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )