आजकाल फॅशनसोबतच लोक धार्मिक श्रद्धा देखील पाळतात. महिला विशेषतः पैंजण आणि काळा धागा घालतात, कधीकधी स्टाईलसाठी तर कधीकधी वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी. पण अनेकांना प्रश्न पडतो की दोन्ही गोष्टी एकत्र घालणे योग्य आहे की नाही? ज्योतिषांच्या मते, पैंजण आणि काळा धागा वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित आहे. पैंजण शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत आणि ते स्त्री सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात, तर काळा धागा वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करतो असे मानले जाते. पैंजण आणि काळा धागा एकत्र बांधणे यामुळे शुभ गोष्टी होतात की ते अशुभ ठरतात, काय सांगतं शास्त्र पाहूयात…
पायात पैंजण का घातले जातात?
पैंजण हे केवळ एक अलंकार नाही, तर ते धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. हे स्त्रियांच्या पायात घातले जाते आणि त्यांच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करते. पैंजण शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, विशेषत: चांदीच्या पैंजणांना महत्व आहे. पैंजणाला स्त्रियांच्या अलंकारामध्ये एक महत्वाचे स्थान आहे. पैंजण नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, असे मानले जाते. पैंजण शरीरातील ऊर्जा प्रवाहांना संतुलित ठेवण्यास मदत करते. पैंजण घातल्याने रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे पायदुखी आणि इतर वेदना कमी होऊ शकतात.

पायात काळा धागा बांधण्याचे महत्त्व
पायात काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की शनिदोष, नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण. ज्योतिषशास्त्रानुसार, काळा धागा शनि ग्रह आणि राहू-केतूशी संबंधित आहे. काळा धागा आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, पायात काळा धागा बांधल्याने शनिदेवाचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल येतात. पुरुषांनी उजव्या पायात आणि महिलांनी डाव्या पायात काळा धागा बांधावा.