मुंबई – सध्या भारतात आयपीएलचा (IPL) महासंग्राम सुरू आहे. त्यामुळे देशात सध्या क्रिकेटमय वातावरण आहे. आयपीएलच्या धर्तीवर मुंबईत टी-20 मुंबई क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन यापूर्वी 2018 आणि 2019 रोजी झाले होते. मात्र त्यानंतर कोरोना आणि कोविडमुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र आता चक्क सहा वर्षानंतर पुन्हा एकदा टी-20 मुंबई क्रिकेट लीगचा तिसरा हंगाम सुरु होत आहे. दरम्यान, आज टी-20 मुंबई क्रिकेट लीग स्पर्धेच्या ट्रॉफीच अनावरण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. रोहित शर्मा हा या लीगचा ब्रँन्ड अंम्बेसेडर आहे.
रोहितचा यशाच्या मंत्र कोणता?
रोहित आज तु मोठा क्रिकेटपटू आहे, तु भारताला टी-२० विश्वचषण आणि चॅम्पिअन ट्रॉफी जिंकून दिली आहेत. त्यामुळं रोहित शर्माच्या यशाचा मंत्र काय आहे? असं रोहितला विचारले असता, यावेळी रोहितने काही प्रश्नांना मराठीत उत्तर दिले. एका दिवसाच्या अपयश-यशाने खचून नका. गेलेल्या दिवसाचा विचार करू नका… तर येणाऱ्या दिवसाचा विचार करा आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, याचा विचार करा… तुम्ही नाराज होऊ नका… असे मला वाटते. असं रोहित शर्माने सांगितले.. तू कशाप्रकारे क्रिकेटला सुरुवात केली? असं रोहितला विचारले तर मी आमच्या आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये सामने व्हायचे. त्यावेळी आम्ही ५-१० रुपये काढून क्रिकेटचे सामने खेळत मी मोठा झालो आहे, असं रोहितने सांगितलं.

किती संघ आणि स्पर्धा कधीपासून?
दरम्यान, टी-20 मुंबई क्रिकेट लीग स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. या लीगमधील सामने बीकेसी बांद्रा आणि वानखेडे स्टेडियमयेथे खेळवले जाणार आहेत. सामन्यांचे वेळापत्रक आणि स्पर्धेचे स्वरूप याच्यावर आमची चर्चा सुरू असून, लवकरच याबाबत आम्ही माहिती देऊ, या लीगमधून अनेक मोठे खेळाडू निर्माण झालेत. आणि आगामी काळातही मुंबईसाठी…, देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू तयार होतील. अशा विश्वास एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. क्रिकेटसाठी, क्रिकेटपट्टूंसाठी एमसीएकडून (MCA) पाठिंबा देत आहोत. ही स्पर्धा २६ मे २०२५ पासून सुरु होणार आहे. अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिलेय.