पीयूष चावलानं क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, वर्ल्ड कपच्या आठवणी कायम मनात राहतील, भावूक पोस्ट

टी-20 आणि वर्ल्डकप विजेत्या टीममधील क्रिकेटर पीयूष चावलानं त्याची सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलीय. यावेळी त्यानं क्रिकेटबाबत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

मुंबई- टीम इंडियाचा स्पीनर बॉलर पीयूष चावलानं क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलीय. दोन दशकांपासून जास्त काळ ग्राऊंडवर खेळल्यानंतर आता या सुंदर खेळाला गुडबाय करण्याची वेळ आली आहे, असं पियूषनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलंय.

2007 साली टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीममध्ये पीयूष चावलानं चमकदार कामगिरी केली होती. कोलकता नाईट रायडर्सच्या वतीनं दोन आयपीएल टायटल जिंकण्यातही त्याचा वाटा राहिला. टीम इंडियाकडून 3 टेस्ट, 25 वनडे आणि 7 इंटरनॅशनल मॅचममध्ये पियूषचा सहभाग होता. त्यानं एकूण 43 मॅच खेळल्या.

पियूष चावलाची भावनिक पोस्ट

निवृत्तीची माहिती जाहीर करताना पीयूष चावलानं इन्स्चावर भावनिक पोस्ट लिहिलियं. त्यात पियूषनं लिहिलंय की, टॉप लेव्हलला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासोबतच 2007 साली विजय मिळवलेल्या टी-20 वर्ल्डकप आणि 2011 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा एक भाग म्हणून, या अविश्वसनीय यात्रेत प्रत्येक क्षण कोणत्याही वरदानापेक्षा कमी नव्हता. या आठवणी सतत माझ्या मनात कोरलेल्या राहतील.

आयपीएलच्या ज्या फ्रेंचाईजींनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनाही मनापासून धन्यवनाद. पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, चैन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स. आयपीएल हा माझ्या करियरमधला वेगळा अध्याय होता. आणि यात खेळताना प्रत्येक क्षणी मला काहीतरी गवसलं आहे.

वडिलांशिवाय हे शक्य नव्हतं-पीयूष

पीयूषनं या पोस्टमध्ये कोच, कुटुंब आणि वडिलांचे भार मानले आहेत. त्यानं लिहिलंय, मी माझे कोच केके गौतम आमि स्व. पंकज सारस्वत यांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी मला क्रिकेटर म्हणून विकसीत केलं. माजं कुटुंब या सगळ्या प्रवासात माझी ताकद आणि दीपस्तंभासारखं माझ्यासोबत कायम राहिलं. कुटुंबातून मिळालेला पाठिंबा हा चढ उताराच्या काळात फार उपयोगी ठरला. माझ्या दिवंगत वडिलांचा उल्लेख आवर्जून करेन, त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता आणि त्यांनी माझ्यासाठी मार्ग तयार केला. त्यांच्याशिवाय हा प्रवास संभव नव्हता.

निवृत्तीच्या घोषणेचा दिवस हा भावनिक असल्याचं सांगत, क्रीझपासून जरी दूर जात असलो तरी क्रिकेट माझ्या आत कायम जिवंत राहील, असं त्यानं लिहिलंय. या सुंदर खेळाची भावना आणि त्यातून मिळालेलं मूल्य घेऊन एक नवा प्रवास करण्यासाठी मी उत्सुक आहे. असा समारोप त्यानं केलाय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News