8 वर्षांनंतर करुण नायर टीम इंडियात, दोन सामन्यात सर्वाधिक अंतर असलेल्या खेळाडूंची यादी पाहा

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज शुक्रवारपासून कसोटी मालिका सुरू झाली. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या करुण नायर याने जवळपास 8 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. नायरने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता त्याचे इंग्लंडविरुद्ध पुनरागमन झाले आहे. या 8 वर्षांत नायरने 77 कसोटी सामने मिस केले. अशा स्थितीत आपण येथे अशा 5 भारतीय खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जास्त अंतर पडला आहे.

दोन कसोटींमध्ये सर्वाधिक अंतर असलेले 5 खेळाडू

1. जयदेव उनाडकट

भारताकडून दोन कसोटी सामने खेळण्यात सर्वाधिक अंतर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने घेतले. त्याने भारतासाठी 118 कसोटी सामने मिस केले. उनाडकटला 2010 नंतर थेट 12 वर्षांनी 2022 मध्ये कसोटी संघात स्थान मिळाले.

2. दिनेश कार्तिक

भारतीय यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारतासाठी 87 कसोटी सामने मिस केले. कार्तिकने 2010 नंतर तब्बल 8 वर्षांनी 2018 मध्ये परत कसोटी सामना खेळला.

3. पार्थिव पटेल

यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल 2008 मध्ये टीम इंडियातून बाहेर झाला होता. त्यानंतर भारतासाठी पुन्हा खेळण्यासाठी त्याला 8 वर्षे वाट पाहावी लागली. पार्थिवने 2016 मध्ये पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने या काळात 83 कसोटी सामने मिस केले.

4. करुण नायर

भारतीय फलंदाज करुण नायर 2017 नंतर आता पुन्हा भारताकडून खेळताना दिसणार आहेत. या 7 वर्षांत त्याने 77 कसोटी सामने मिस केले. या काळात नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली, ज्यामुळे त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे.

5. अभिनव मुकुंद

भारतीय फलंदाज अभिनव मुकुंद 2011 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर गेला होता. त्यानंतर त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी 6 वर्षे लागली. मुकुंदला 2017 मध्ये पुन्हा संधी मिळाली आणि त्याने या काळात 56 कसोटी सामने मिस केले होते.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News