ऑपरेशन सिंदूर ‘फेल्युअर’ या विधानावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण, आता काय म्हणाले? जाणून घ्या

खासदार राऊत म्हणाले, "मी म्हटलं की त्यांनी इंडिया गेटसमोर त्यांचा एनकाऊंटर करावा. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल.

ऑपरेशन सिंदूरबाबत ‘फेल्युअर’ या विधानामुळे अडचणीत आल्यानंतर, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही कधीही असे म्हटले नाही की ऑपरेशन सिंदूर अयशस्वी झाले आहे. ऑपरेशन सिंदूर ही आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा आहे. त्या बाबतीत जे राजकारण केले जात आहे, ते राजकारण अपयशी ठरले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, “मी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले होते की, पहलगाममध्ये आमच्या २६ बहिणींचे सिंदूर पुसणाऱ्या ६ दहशतवाद्यांना पकडून दिल्लीत आणून त्यांची ओळख पटवली जात नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण राहील.”

संजय राऊत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे गटाचे खासदार राऊत म्हणाले, “मी म्हटलं की त्यांनी इंडिया गेटसमोर त्यांचा एनकाऊंटर करावा. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल. आता यावर भारतीय जनता पक्षाला मिर्ची लागण्याचे कारण काय? ऑपरेशन सिंदूरवर जे हे लोक राजकारण करत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये असा भ्रम निर्माण होत आहे की भारतीय जनता पक्ष संपूर्ण ऑपरेशनमध्ये झालेल्या चुका लपविण्यासाठी सिंदूर यात्रा काढत आहे.”

संजय राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही आम्हाला राजकारण करू नका असे सांगितले होते, मोदीजींनी हे सांगितले होते. संपूर्ण विरोधकांनी हे मान्य केले होते. राहुल गांधी असोत, खर्गे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, सर्वांनी हे मान्य केले होते. मग आता राजकारण कोण करत आहे?”

ते ६ दहशतवादी कुठे गेले?’

सरकारवर निशाणा साधत राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत, गृहमंत्री अमित शहा राजकारण करत आहेत. आजही माझी मागणी आहे, की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहे. कारण या २६ जणांचा मृत्यू गृहमंत्रालयाची चूक आहे. हे त्यांचे अपयश आहे. त्यामुळे आम्हाला ऑपरेशन सिंदूर करावे लागले. अमित शहा काही जबाबदारी घेणार की ते फक्त भाषणेच देतील. ते ६ दहशतवादी कुठे गेले? ते भूमिगत झाले, हवेत गेले की भाजपमध्ये गेले, मला सांगा?”

पुढे ते म्हणाले, “तुम्ही ते लपवले का? सर्व विरोधी पक्षांनी अमित शहांचा राजीनामा मागितला पाहिजे. सर्वप्रथम राहुल गांधींनी तो मागितला पाहिजे, खरगे जींनी तो मागितला पाहिजे. आम्ही या प्रकरणात सरकारला पाठिंबा देत आहोत. तुमच्यामुळे (गृहमंत्री) आमच्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले गेले आहे. मी हेच सांगितले आहे आणि मी हेच सांगत राहीन.”


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News