हल्ल्याच्या 2 दिवसानंतर अजूनही महाराष्ट्रातील 20 ते 22 हजार पर्यटक कश्मीरमध्ये अजूनही अडकले, महाराष्ट्रात परत कधी येणार?

हल्ल्यानंतर अजूनही महाराष्ट्र आणि गुजरातमधील 20 ते 22 हजार पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडल्याची माहिती महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने दिली आहे.

मुंबई – मंगळवारी काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवादांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळत असून, या विरोधात देशभर मोर्चे आणि आंदोलन काढले जात आहेत. दहशतवाद्यांचा एकदाच काय तो खात्मा करा, असे जनसामान्यांची भावना आहे. या हल्ल्याच्या दोन दिवसानंतरही  अजूनही 20 ते 22 हजार पर्यटक कश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे.

पर्यटनांवर परिणाम होण्याची शक्यता…

दरम्यान, हल्ल्यानंतर अजूनही महाराष्ट्र आणि गुजरातमधील 20 ते 22 हजार पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडल्याची माहिती महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने दिली आहे. काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाता आणि देशातील मिनी स्विंझलँड म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते. पर्यटकांसाठी काश्मीर हे नंदनवन मानले जाते. काश्मीरमध्ये देशासह जगभरातील पर्यटक सहलीचा आनंद घेण्यासाठी जातात. काश्मीरमध्ये उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते. इथे कोणतेही उत्पन्नाचे अन्न साधन नसल्यामुळे पर्यटन हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. दरवर्षी २ ते ३ करोड व्यवसाय टुरिझममधून होतो. परंतु या हल्ल्यानंतर याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री काश्मीरमध्ये दाखल…

अजूनही महाराष्ट्रातील 20 ते 22 हजार पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी काश्मीरला दाखल झालेत. त्यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, तर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, महाराष्ट्रातील जे पर्यटक अडकलेत त्यांना महाराष्ट्रात सुखरूप परत आणण्यासाठी व्यवस्था करत आहे. तसेच पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन कोणाचीही गैरसोय होणार नाही, हे पाहत आहेत. दरम्यान आता हे २० ते २२ हजार पर्यटक काश्मीरमध्ये अडकले, त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार युद्धपातळीवर काम करत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News