Operation Sindoor : पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडणारं भारताचं ‘सुदर्शन चक्र’ एस 400 काय आहे?

भगवान श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्र अस्त्राचे या मिसाईल सिस्टीमला नाव देण्यात आलं आहे. या मिसाईलच्या मदतीने पाकिस्तानचा हल्ला उलथवून लावण्यात आला.

7 मे रोजी रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भटिंडा, फालोदी, अमृतसर, लुधियाना, चंदीगड, उत्तरलाय, कपूरतला, आदमपूर, नाल, भूज या 15 भागात ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने भारत आणि एलओसीवर केलेल्या हल्ल्यात 16 भारतीयांचा मृत्यू झाला असून यात तीन महिलांचा समावेश आहे.

यालाच प्रत्युत्तर म्हणून भारताकडून पाकिस्तानच्या विविध शहरांत ड्रोन हल्लेही करण्यात आले. त्यात कराची, लाहोर आणि रावळपिंडीसारख्या शहरांचा समावेश आहे. भारतीय सैन्याने काऊंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे सर्व हल्ले परतवून लावले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्याचा हा हल्लाचा प्रयत्न हाणून पाडलाय. रात्री सुदर्शन चक्र एस 400 या क्षेपणास्त्र रोखणाऱ्या यंत्रणेनं हा हल्ला हाणून पाडण्यात आला.

हे हल्ले रोखणारी एस 400 यंत्रणा आहे हे पाहूयात

एस 400 सुदर्शन चक्र क्षेपणास्त्र कसं आहे?

  • हवाई हल्ला रोखण्यासाठी बनवलेली मिसाईल सिस्टीम
  • जमिनीवरून हवेत लांब पल्ल्याचा मारा करणारी मिसाईल सिस्टीम
  • फायटर जेट, क्रूझ मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल अशा हवाई धोक्यांना निष्प्रभ करण्याची क्षमता
  • भगवान श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्र अस्त्राचे या मिसाईल सिस्टीमला नाव
  • पाकिस्तानच्या संभाव्य हल्ल्यांना रोखण्यासाठी सीमेवर एस 400 सुदर्शन तैनात
  • चीनच्या एचक्यू 9 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमपेक्षा जबरदस्त मिसाईल
  • अशा सिस्टीममुळे रॉकेट, मिसाईल, ड्रोनचा शोध आधीच माग काढला जातो
  • शत्रूच्या रॉकेट, मिसाईल आणि ड्रोनला हवेतच नष्ट करण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र
  • रशियाने बनवलेल्या या क्षेपणास्त्राची भारताकडून खरेदी

पाकिस्तानात हल्ल्याबाबत सरकारची काय भूमिका

भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडच्या शहरांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काऊंटर UAS ग्रीड आणि हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे यशस्वीपणे निष्प्रभ करण्यात आलं. हल्ल्याच्या ठिकाणाहून अवशेष गोळा करण्यात येत असून हे पाकिस्तानच्या हल्ल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स रडार आणि सिस्टीमवर हल्ला केला.

पाकिस्तानच्या हल्ल्यांना त्यांच्याच प्रमाणात आणि त्या क्षेत्रात प्रत्युत्तर देण्यात आलं. लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानकडून एलओसीवर उघड-उघड गोळीबार, तोफांचा मारा करण्यात वाढवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 3 महिला आणि 5 मुलांसह 16 नागरिकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून कारवाई करावी लागली. पाकिस्तानने अधिक आगळीक केली तर यापेक्षा ठोस प्रत्युत्तर देण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News