Amit Shah : मुंबईतील माधवबाग येथील श्री. लक्ष्मी नारायण मंदिराचा आज १५० वा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, १५० वर्ष अविरत समाजसेवेचे कार्य केल्याबद्दल माधवबाग परिवाराचे अभिनंदन. ही संस्था २०० वर्ष पूर्ण करेल, तेव्हा आपल्या मातृभाषेचे प्रशिक्षण केंद्र असावं. यात गीता, उपनिषदं आणि वेदांचं शिक्षण मिळावे आणि आरोग्य सेवा देखील मिळावी. असे अमित शहांनी सुचवले.
मोदींचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल…
दरम्यान, पुढे बोलताना शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक वर्ष प्रलंबित ऐतिहासिक निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतले. तसेच मोदीजींच्या कार्यकाळात भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. आणि २०४७ साली आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. असंही शहा म्हणाले.

घरात घुसून मारलो…
दुसरीकडे हा हा बदललेला भारत आहे… हा नवा भारत आहे… जो आमच्या माता भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना, त्यांच्या घरात घुसून मारलो. आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे आपल्या माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली आहे, असं अमित शहा म्हणाले. तर या वास्तूमध्ये फक्त देवाची मूर्ती नसून, तर प्रत्यक्ष वास्तव्य आहे. येथे अखंडित सेवाकार्य सुरु आहे. माधवबागच्या माध्यमातून गोसेवा, समाजसेवा यासह अन्य प्रकारच्या मदत कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेण्यात आला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी म्हणाले.