भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचा महसूल वाढला, मात्र लाखोंनी प्रवासी घटले; काय आहे कारण?

मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ आहेत. तिकीट दरात थेट दुप्पट वाढ करण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई – मुंबईकरांसाठी महत्त्वाची असलेल्या बेस्ट बससेवेची दरवाढ आणि शहरात सुरु झालेली मेट्रो सेवा याचा एकत्रित परिणाम बेस्टच्या प्रवाशी संख्येवर होताना पाहायला मिळतोय. ९ मे पासून बेस्टची सुमारे दुप्पट दरवाढ झाली. त्यानंतर महिनाभरात बेस्टच्याप्रवाशआंची संख्या सुमारे पाच लाखांनी घटल्याचं समोर आलंय.

बेस्टच्या प्रवाशांची संख्या घटली असली तरी भाडेवाढ केल्यामुळे बेस्टच्या महसुलात मात्र सरासरी ७४ कोटींनी वाढ झाल्याचं समोर आलंय. बेस्ट दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर आता शेअर टॅक्सी आणि शेअर रिक्षांना अधिक प्राधान्य देताना दिसतायेत.

बेस्टच्या दरवाढीच्या निर्णयाचा फायदा

बेस्ट गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं तोट्यात होती. खासगीकरणामुळे बेस्ट संकटात सापडली असल्याचं सांगण्यात येत होते. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी बेस्टसमोर सरकारी मदतीचा केवळ प्रस्ताव होता.

जुलै 2019 मध्ये सरकारच्या निर्देशानं बेस्टनं भाडे कमी करुन प्रवाशी संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रवाशी संख्या 17 लाखांवरुन 31 लाखांवर पोहचली होती. मात्र बेस्टचा तोटा मात्र प्रवाशी संख्या वाल्यानं कमी झाला नव्हता. अखेरीस बेस्टच्या दरवाढीला महापालिकेनं मंजुरी दिली. बेस्ट दरवाढीनंतर पहिल्याच दिवशी बेस्टचा महसूल 2 कोटी 93 लाख 41 हजारांवर पोहचला होता.

मुंबईकरांनी का सोडली बेस्टची साथ

बेस्टचं भाडेवाढ करण्यापूर्वी किमान भाडं पाच रुपये होतं. तर एसीचं भाडं 6 रुपये होतं. त्यामुळे शेअर टॅक्सी, रिक्षाला 15 रुपये मोजण्याऐवजी मुंबईकर बेस्टची प्रतीक्षा करत असत, आता किमान भाडं 10 ते 12 रुपयांवर पोहोचल्यानं मुंबईकर शेअर रिक्षा-टॅक्सीला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय. बेस्टसाठी वाटत पाहत थांबण्यापेक्षा काही रुपये जास्त देण्याची मुंबईकरांची तयारी दिसतेय.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News