भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र होण्याच्या मार्गावर, क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत

भारतीय पारंपरिक ज्ञान, स्टार्टअप संस्कृती आणि नवाचाराला परदेशी विद्यापीठे देखील आत्मसात करू लागली आहेत. युकेच्या अंदाजे ३०० आंतरराष्ट्रीय केंद्रांचा दाखला देत भारतातही अशा सहकार्याच्या अमर्याद शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

Mumbai Rising : सध्या भारताने शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली असून, भारत उच्च शिक्षणाच्या जागतिक नकाशावर एक नवा अध्याय लिहित आहे. उद्योग, सरकार, तंत्रज्ञान, परदेशी विद्यापीठे आणि स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने भारत जगातील आघाडीचे शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत आहे. असे मत ऑस्ट्रेलिया व ब्रिटनच्या उच्चायुक्तातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मुंबई रायझिंग क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या कार्यक्रमात ते बोलत होते.

सामर्थ्यवान भारताच्या उभारणीचे पर्व ठरणार…

दरम्यान, भारतात केवळ शिक्षणाचे नव्हे तर सांस्कृतिक, आर्थिक आणि सामर्थ्यवान भारताच्या उभारणीचे पर्व ठरणार आहे. भारतातील परदेशी विद्यापीठांची वाढते स्थान, दोन्ही देशांतील सहकार्याचे स्वरूप आणि भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर नेतृत्व मिळवण्यासाठीची गरज यावर तज्ज्ञांनी मत मांडले. “मुंबई रायझिंग क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” राज्य सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ५ जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई व नवी मुंबईत कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे याचे वाटप करण्यात आले.

मुंबई ही सर्जनशील उद्योगांची राजधानी…

युके सरकारच्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक धोरणात सर्जनशील क्षेत्राला अग्रक्रम आहे आणि भारतासोबत सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही केवळ आर्थिक नव्हे तर सर्जनशील उद्योगांची राजधानी आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक सहकार्याला विशेष महत्त्व आहे. लंडनच्या इम्पीरिअल कॉलेजने नुकतीच बेंगळुरूमध्ये आपली शाखा उघडली आहे. तसेच पूर्वी शिक्षणासाठी देशाबाहेर गेलेले विद्यार्थी भारतात परत येत नसत. पण आता ही परिस्थिती बदलते आहे. ‘ब्रेन ड्रेन’ ऐवजी आता ‘ब्रेन सर्क्युलेशन’ घडत आहे,” असे अ‍ॅलिसन बारेट यांनी स्पष्ट केले.


About Author

Astha Sutar

Other Latest News