Jayant Patil : मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला. घाटकोपर येथे संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते.
मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न…
दरम्यान, अण्णाभाऊ साठे नजीकच्या परिसरात राहायचे आणि त्या वास्तव्यात त्यांनी फकिरा ही कादंबरी लिहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लिहिलेले साहित्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरले असे त्यांनी सांगितले. इतिहासाचे दाखले पाहता घाटकोपर हे चळवळींचे शहर आहे, असे प्रकर्षाने जाणवते. मध्यंतरी एक बातमी आली की पेटंट कार्यालयाचं मुख्यालय मुंबईतून थेट दिल्लीला हलवलं जातंय. मुंबई आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही. आज मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप त्यांनी केला.

पालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली…
मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. विविध अपघातात सर्वसामान्य मुंबईकरांचा नाहक जीव जातोय. त्याची जबाबदारी घेतली जात नाही अशी खंत पाटील यांनी बोलवून दाखवली.