मुंबई : पहेलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये जर कोणी मुंबई शहर आणि जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष – मुंबई शहर
दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)
संपर्क क्रमांक : 8657106273
संपर्क क्रमांक : 7276446432

‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन…
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
पर्यटकांसाठी आपल्कालीन मदत कक्ष
24 तास पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय, डीसी कार्यालय येथे पर्यटकांसाठी मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
संपर्क करण्यासाठी –
A) 0194-2483651
0194-2457543
B) व्हॉटसअप नंबर –
7780805144
7780938397
सौजन्य : आपत्कालीन नियंत्रण कक्ष, श्रीनगर