मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र (VIS नसल्यास) देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत. प्रचाराच्या संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आले आहेत.

Election Commission – देशात आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोबाईल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता, आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, असं बोलले जात आहे.

बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी…

दरम्यान, मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील.
तसेच प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली आहे. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ यांच्याशी सुसंगत आहेत. मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

आयोग नवकल्पना राबवत आहे…

दुसरीकडे मतदान गुप्ततेचा नियम (नियम ४९एम) यापुढेही काटेकोरपणे पाळला जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली, आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे.

भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच प्रवेशद्वाराजवळ सोप्या बॉक्स किंवा पोत्यांद्वारे ही सुविधा दिली जाणार असून, मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, काही ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्यास, निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात.


About Author

Astha Sutar

Other Latest News