Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती देश-विदेशात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने राज्यासह राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईतील चैत्यभूमी येथे राज्यातील अनुयायी येत बाबासाहेबांना अभिवादन करतात. याकरिता चैत्यभूमीवर आज निळा जनसागर लोटल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री आशिष शेलार आणि मंत्री संजय राठोड यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
बाबासाहेबांचे कार्य अतुलनीय…
दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह केवळ भारतात नाही तर जगभरात दिसून येत आहे. बाबासाहेबांचे कार्य अतुलनीय आहे. देश तयार करण्यासाठी जो पाया मजबूत लागतो. तो पाया बाबासाहेबांनी तयार केला. बाबासांहेबांच्या कार्यामुळं आज आपण एकसंघ भारत बघतोय, याचे श्रेय बाबासाहेबांना आणि संविधानाला द्यावेल लागेल. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतायेत… अमृत महोत्वस साजरा केला जात आहे. पूर्वी देशात ज्या चुकीच्या रुढी, परंपरा होत्या यामुळं माणूसच माणसाला माणूस म्हणत नव्हता. मानव मानवाला मानवासारखी वागणूक देत नव्हता. यातून बाहेर काढण्याचे काम बाबासाहेबांनी केले. आणि देशात समता आणि बंधुता स्थापित करण्याचे काम बाबासाहेंनी केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संविधानामुळं देश एकसंघ…
संविधनाच्या माध्यमातून जगण्यातील समान हक्क आणि अधिकार मिळाला. समान अधिकार मिळल्याने स्वप्न पूर्ण करण्याचे बळ मिळाले. संविधाचा गाभा हा भगवान गौतम बुद्धांच्या विचारातून आला आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, मला कोणत्याही ग्रंधापेक्षा प्रिय संविधान आहे. कारण संविधान देश घडविण्याचे काम केले आहे. बाबासाहेब हे कायदेतज्ज्ञ होते. सामाजिक, आर्थिक क्षेत्रात त्यांचा मोठा हातखंडा होता. आणि सामाजिक दूरदृष्टी होती. म्हणूनच विकासाचा पाया रचणारे बाबासाहेब होते, असं मुख्यमंत्री म्हणाले.
बाबासाहेबांचा विश्वकल्याणाचा विचार…
आजची मानवंदना राष्ट्रपुरुषाला ही त्या आहे. आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा आपण संकल्प करुया, बाबासाहेबांनी स्वत:चा नाही समाजाचा, स्वत:चा नाही देशाचा, स्वत:चा नाही तर विश्वकल्याणाचा विचार केला. त्यामुळं बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी राष्ट्रपुरुष आहेत. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर बाबासाहेबांनी जीवन देशासाठी समर्पित केले. बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात तळागळातील लोकांना समान अधिकार आणि हक्क मिळतोय. त्यांच्यामुळं आज गरीबांतील गरीब व्यक्तीही मोठे स्वप्न पाहू शकते. ती स्वप्न साकर करु शकते. आणि ती व्यक्ती मोठे होऊ शकते. असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. यावेळी चैत्यभूमीवर मोठा जनसागर पाहयला मिळाला.