दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 भारतीय तर एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाहून भारतात दाखल झाले त्यांनी आज दिवसभर बैठकींचा धडाका लावला. कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेत पाकिस्तानला दणका देण्यात आला आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, भारत सरकारने पाकिस्ताना नागरिक व्हिजावर भारतात आले आहेत. त्यांना अवघ्या 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाकिस्तान दुतावासात असलेल्या पाच अधिकाऱ्यांना देखील एक आठवड्याचे आत भारत सोडण्यास सांगितले आहे.

केंद्रीय कॅबिनेट सुरक्षा समिती (सीसीएस) ची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी पार पाठली. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये दहशतवाद्यांना छुपा पाठींबा देणाऱ्या पाकिस्तानची कोंडी करणारे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "Recognising the seriousness of this terrorist attack, the Cabinet Committee on Security (CCS) decided upon the following measures- The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan… pic.twitter.com/PxEPrrK1G8
— ANI (@ANI) April 23, 2025
सिंधू जलकराराला स्थगिती
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक सिंधू जल करार करण्यात आला होता. या कराराला आज कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अटारी-वाघा बाॅर्डर एक मे पर्यंत नागरिकांच्या प्रवासासाठी तातडीने बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाही
नव्याने कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत तो भारत देश सोडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.