जून आणि जुलै या महिन्यांत बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात अनेक मोठे बदल घडत असतात. अशा परिस्थितीत लोकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि बँकिंग सेवांशी निगडीत अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. अशा परिस्थितीत आता अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे 1 जुलैपासून महागणार आहे. बँक आपल्या विथड्रॉल चार्जेस मध्ये वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
किती रूपयांची वाढ होणार?
आता ग्राहकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने आता व्यवहार शुल्क (ट्रांजॅक्शन फी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने बचत आणि ट्रस्ट खात्यांसाठीच्या टॅरिफ रचनेत बदल केला आहे, त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला एटीएममधून पैसे काढताना जास्त शुल्क मोजावे लागणार आहे.

आरबीआयच्या अधिसूचनेनंतर शुल्कात वाढ
अॅक्सिस बँकेने बचत आणि ट्रस्ट खात्यांसाठीच्या टॅरिफ रचनेत बदल केला आहे.त्याअंतर्गत एटीएमची ट्रांजॅक्शन फी वाढणार आहे. याआधी आरबीआयने एक अधिसूचना जारी केली होती, यात बँकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून जास्तीत जास्त 23 रुपये शुल्क आकारण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानुसार आता शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 जुलै 2025 पासून एटीएमची ट्रांजॅक्शन फी वाढणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. कॅश रिसायकलर मशीनवर (कॅश डिपॉझिट व्यतिरिक्त) केलेल्या व्यवहारांवर देखील लागू असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. अॅक्सिस बँकेचे ग्राहक सध्या मेट्रो सिटीमध्ये एका महिन्यात 3 वेळा एटीएममधून पैसे काढू शकतात. तसेच नॉन-मेट्रो शहरांतील ग्राहक जास्तीत जास्त 5 मोफत व्यवहार करु शकतात. मात्र अॅक्सिस बँके मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये शुल्क आकारते, मात्र 1 जुलैपासून हा बदल लागू झाल्यानंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क आकारणार आहे.
ग्राहकांच्या खिशाला कात्री
एटीएम चार्जेस वाढल्यावर ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आधीच आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांवर बँकांच्या वाढत्या सेवा शुल्कामुळे अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर वाढीव शुल्क आकारले जात असल्यामुळे अनेक ग्राहक संतप्त झाले आहेत. काहींनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत बँकिंग धोरणांवर टीका केली आहे. खासकरून ग्रामीण व निमशहरी भागात, जिथे लोक मुख्यतः रोख व्यवहारांवर अवलंबून असतात, तिथे याचा मोठा परिणाम जाणवतो. ग्राहक संघटनांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत रिझर्व्ह बँकेकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.