महाराष्टसह मुंबईत पावसाची काय स्थिती? वातावरण कसे राहणार?, हवामाने विभागाने काय म्हटलंय?

राज्यातील विविध भागात म्हणजे ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात  मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. दुसरीकडे विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

State Rain – मे महिन्यातील 25 आणि 26 तारखेला राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मे महिन्यात सरासरी पेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला. त्यामुळं धरण आणि नदीमध्ये जलसाठा वाढला. मे महिन्यातच विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. हा पाऊस सरासरीपेक्षा ११ पट जास्त असल्याचे हवामाने विभागने म्हटले आहे. उन्हाळ्यात विहिर भरल्या आहेत, नदी नाल्यांना पूर आला. मात्र गेल्या आ़वड्यापासून पावसाने उसंत घेतली आहे.

१० तारखेनंतर पेरणी करा…

यापूर्वी १९१८ मध्ये मे महिन्यात ११३.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी १४.४ टक्के आहे. परंतु, विशेष म्हणजे मे महिना हा उन्हाळाच महिना म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. पण सध्या पेरणी करु नका, सध्याचा पाऊस शेतीसाठी अनुकूल नाही, १० तारखेनंतर पावसाची स्थिती पाहूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

ढगाळ वातावरण व मध्यम स्वरुपाचा पाऊस

दरम्यान, गेल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र आता पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवस राज्यातील विविध भागात म्हणजे कोकणातील पालघर, ठाणे, आणि मुंबईत पुढील काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरणासह व मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर पुणे जिल्ह्यातही या काळात पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News