उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच, चंद्रशेखर बावनकुळेंची टिका

उद्धवजी, तुम्ही अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारीत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते. ती तुमच्यात नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.

Chandrashekhar Bawankule – गुरुवारी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टिका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया येत असताना आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टिका केली आहे. उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज त्यांनी केलं. असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंची चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

गरळ ओका, टोमणे मारा…

दरम्यान, मुंबई आमची म्हणणाऱ्यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? असा सवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. “शिवसेना संपली नाही” म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात. आदरणीय मोदीजी-अमितभाई- देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर, राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धवजी मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे. तुम्ही गरळ ओका, टोमणे मारा… पण जनतेची साथ महायुतीलाच आहे, असं बावनकुळे म्हणाले.

मराठी माणसाचं काय केलं?

मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या देवेंद्रजींच्या पुढाकारानं झाल्यात हे मुंबईकरांना माहित आहे. जे ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं? महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केलं का?” मुंबई आमची आहे, हे तुम्ही ओरडून सांगत राहा, पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर मुंबईवर भाजपा- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे हीच मुंबईकरांची इच्छा आहे, असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News