अचानक पावसामुळं यंत्रणांची धावपळ झाली, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

अचानक पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले. पण आता मुंबईतील पाणी हळूहळू ओसरत आहे. नालेसफाई सध्या सुरू आहे, त्यामुळे त्या ठिकाणीही पाणी साचले. सर्व यंत्रणा सतर्क असून, युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

Mumbai Rain – मुंबई, उपनगरसह राज्यातील अनेक भागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतूकीवर दिसून आला. वाहतूक विस्कळीत झाली तर रस्ते वाहतूकीवरही याचा परिणाम दिसून आला. दरम्यान, मुंबईत ठीकठिकाणी भागात म्हणजे सायन, हिंदमाता, भायखळा आदी भागात पाणी तुंबले.

ढगफुटीसारखा पाऊस झाला…

दरम्यान, या मुसळधार पावसानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाच्या परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. मुंबईतील अनेक भागात अपेक्षापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस पडला. आपली जी यंत्रणा आहे, ती सतत काम करत आहे. अचानक पाऊस पडल्यामुळे सर्व यंत्रणांची धावपळ उडाली. मुंबईत ढगफुटीसारखा पाऊस पडला, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नालेसफाई एआयच्य़ा माध्यमातून…

नागरिकांनी देखील सतर्क राहिले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे, तसेच नागरिकांनी शासन आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. यावर्षी पालिकेनं एआयच्य़ा माध्यमातून नालेसफाई केली आहे. सर्व यंत्रणा सतर्क असून अहोरात्र मेहनत करत आहे. ज्या ठिकाणी नाले सफाई झाली नाही किंवा झाली आहे. त्या ठिकाणचे व्हीडिओ लोकांनी तात्काळ संबंधित विभागाला पाठवले पाहिजे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News