Sharad Pawar – महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र येणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. कारण शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकत्र येण्यावरून मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळं विविध तर्कवितर्क काढले जाताहेत.
शेवटी निर्णय सुप्रियाला घ्यायचा आहे…
दरम्यान, तुम्ही अजित पवारांसोबत एकत्र जाण्यावरुन आमच्या पक्षात दोन विचारधारेचे गट आहेत. एक म्हणतोय की, आपण भारतीय जनता पक्षावर जायला नको. तर दुसरा मतप्रवाहाचा गट म्हणतोय की, आपण अजित पवारांसोबत एकत्र गेले पाहिजे. पण मला वाटतं सध्या इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोट अधिक मजबूत बांधली पाहिजे. भाजपासोबत लढण्यासाठी विरोधकांनी पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजे, आणि लढलं पाहिजे असं शरद पवार म्हणालेत.

निर्णय त्या दोघांना घ्यायचा आहे….
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील आणि महाराष्ट्र जर पुढे जात असेल तर भाजपाला यावर काही आक्षेप असण्याचं कारण नाही. जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकाच रक्तातील नाते एकत्र येत असतील आणि महाराष्ट्राचा विकास होत असेल तर आमचा काही आक्षेप नाही. बहीण-भाऊ आहेत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी एकत्र आलं तर महाराष्ट्राचे ते हिताचं आहे. उलट ते एका रक्ताची नाती आहेत. पण शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला याच्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेय.
तर पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतली…
शरदचंद्र पवार साहेब हे देशाचं मोठं नेतृत्व आहे. त्यांच्या पक्षातील नवीन नेतृत्व करणार आहेत, त्यांनी जेव्हा असा एकत्र येण्याचा प्रस्ताव घेऊन येईत, तेव्हा अजितदादा पवार व पक्षाचे ज्येष्ठ यावर योग्य तो नेते निर्णय घेतील, पण अद्यापपर्यंत तरी तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी दिली आहे.