मुंबई : कोकणात मोठ्या प्रमाणात विविध माध्यमातून शेती पिकांचे नुकसान होते. कोकणातील शेतीपिकांना फळबागा आणि वानर आणि माकडांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होत.
नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना…
दरम्यान, वन्यप्राण्यांपासून फळबाग व शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे वनमंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले. तसेच हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माकडे व वानरे यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. कोकणात माकडे व वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. असेंही नाईक म्हणाले.

कायद्याच्या चौकटीत राहून नुकसान भरपाई द्यावी…
दापोलीसह कोकणात रानडुकर, माकड आणि वानरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून, आता माकडे व वानरेही गावात येऊन घरातील वस्तूंचेही नुकसान करत असल्याचै बैठकीत सांगण्यात आले. शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. मात्र, हे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीच्या रक्षणासाठी नियमानुसार परवाने देण्याचे निर्देशही वनमंत्री नाईक यांनी यावेळी दिले. विशेष म्हणजे रानडुकरांमुळे फळबागा तसेच भातशेतीचे नुकसान होते. त्यांचा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून अनुमती देण्यात यावी. तसेच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानीची भरपाई लवकर देण्यात यावी, असे निर्देश यावेळी मंत्री नाईक यांनी दिले.