रस्त्यातील खड्डे बुजले नाहीत, मात्र भाजपा आणि एसंशि यांनी स्वत:चे खिसे भरले, आदित्य ठाकरेंची बोचरी टिका

या सरकारचा लाडका कंत्राटदार आहे. त्यामुळे कंत्राटदारांने रस्त्यांची काम नीट केली नाहीत. मुंबईच्या रस्त्यामध्ये मोठी घोटाळा झाला आहे. नाले सफाई व्यवस्थित न केल्यामुळं पाणी तुंबले.

Aditya Thackeray – मुंबई, उपनगरासह राज्यातील अनेक भागात रविवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर दिसून आला. तर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले, मुंबईची तुंबई झाली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता युवासेना प्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

फोडाफोडीसाठी पैशाचा वापर…

दरम्यान, मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळं पाणी तुंबले, यानंतर दादर, वरळी मेट्रो, हिंदमात आदी ठिकाणची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर सडकून टिका केली. मुंबईत हा पहिला पाऊस नव्हता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला होता. पण आजच्या पावसात मुंबईची पाणी तुंबई झाली. याकडे भाजपा आणि एसंशिंनी लक्ष द्यायला हवे होते. मात्र भाजपा आणि शिंदे गटाने दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना फोडाफोडीसाठी पैशाचा वापर केला.

भाजपा-एसंशिने खिसे मात्र भरले…

मुंबईतील रस्त्यामधील घोटाळा हे मी वारंवार सर्वांसमोर आणला आहे. नालेसफाई व्यवस्थित झाली नाही. हे मी सतत सांगत होतो. परंतु मान्सूनपूर्वी प्रशासन आणि सरकारने कोणतेही तयारी केली नाही.  भाजपा आणि शिंदे गटाने फक्त सत्तेचा आणि पैशाचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला. मुंबईतील रस्त्यातील खड्डे भरले नाहीत. मात्र भाजप आणि एसंशिने मात्र स्वत:च्या खिसे भरले. अशी घनाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News