उबाठाकडून मुंबईकरांशी 1 लाख कोटींची बेईमानी, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप

दोन दिवस पाऊस पडला तेव्हा पाणी साचलेल्या ठिकाणी पंप उपलब्ध नव्हते ते उपलब्ध करून द्यावे. तसेच ब्रिटानिया पंपिंग स्टेशन जवळपास फेल गेले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत पाणी तुंबले. या पंपिंग स्टेशनची निविदा ही आपल्या मर्जितील एईडब्ल्यू या कंत्राटदार कंपनीला मिळावी म्हणून उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी अटींमध्ये कोणते बदल केले.

Ashish Shelar – मुंबईची तुंबई झाली यावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईत निर्माण आलेल्या पुर परिस्थितीबाबत आज आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी शेलार यांनी अनेक सूचना तर केल्याच सोबत ब्रिमस्टोवँडसह मागील 20 वर्षांच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या 1 लाख कोटीच्या कामांची श्वेतपत्रिका काढा,

अशी आग्रही मागणी केली. दरम्यान, गेल्या 20 वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे 1 लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे, असे शेलार म्हणाले.

तीन वर्षांचा हिशेब आम्हाला विचारावा…

दरम्यान, मान्सूनपूर्व कामे सुरु असतानाच मंत्री शेलार यांनी नालेसफाई, रस्ते बांधणीच्या कामांची पाहणी दौरा करुन अनेक बाबी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या होत्या. महापालिकेचे 20 वर्षांचे 80 लाख कोटींच्या बजेट मधील 40 टक्के विकास कामे धरली तर त्यापैकी केवळ 10 टक्के नाले, मिठी नदी, ब्रिमस्टोवँड ला खर्च झाले पकडले तरी 20 वर्षात मुंबईकरांचे 1 लाख कोटी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी खर्च केले. त्याचा हिशेब त्यांनी मुंबईकरांना द्यावा, आणि मग मागच्या तीन वर्षांचा हिशेब आम्हाला विचारावा, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले. तसेंच ही 1 लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप मुंबई उपनगर पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केला.

पालिका मुंबईकरांना सांगणार आहे की नाही?

दुसरीकडे मिठी नदीचा गाळ किती काढला? तो कुठे टाकला? त्यासाठी किती निधी खर्च झाला? याची माहिती मुंबईकरांना द्या. कारण मिठी नदी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून मृत व्यक्तीच्या नावे करार केले गेले, ज्या जागेत गाळ टाकला असे सांगितले जाते आहे त्या ग्रामपंचायत असे काही घडलेच नाही सांगत आहेत. ब्रिमस्टोवँडचा प्रकल्प आजपर्यंत का पुर्ण झाला नाही? त्यासाठी सन 2017 पर्यंत किती निधी खर्च झाला?

तसेच 25 ते 50 मि मि पाऊस झाला तर ही यंत्रणा उभारण्यात येणार होती तीही पुर्ण झाली नाही. यापेक्षा जास्त पाऊस झाला तर काय करणार? आता यापेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडतोच त्यामुळे याबाबत काय करणार ? याचे उत्तर पालिका आयुक्तांनी द्यावे. आर्थिक गुन्हे शाखेकडून जी चौकशी सुरु आहे त्यात हे सारे घोटाळे बाहेर येते आहे. मग पालिका काही मुंबईकरांना सांगणार आहे की नाही


About Author

Astha Sutar

Other Latest News