११वी प्रवेश प्रक्रिया: १ जून रोजी १० लाखांहून जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार- शिक्षण विभाग

सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये ९३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून २० लाख ८८ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

11th Online Admission – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखेर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून, नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये आज जवळपास १० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अशी माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली.

विद्यार्थ्यानी काळजी करू नये…

दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण ९ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी , असेही  शालेय शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेतील अडचणीवर तत्काळ उपायोजना…

प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संकेतस्थळावर ताण येत आहे. संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपायोजना करण्यात आली. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल, नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. संकेत स्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन दि. २६ मे २०२५ पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली.


About Author

Astha Sutar

Other Latest News